यावल प्रतिनिधि अमीर पटेल यावल तालुक्यातील महेलखेडी येथील उपसरपंच म्हणून अशोक तायडे यांची बिनविरोध निवड काही दिवसापूर्वी झाली होती त्याबद्दल आज ग्रा.प महेलखेडी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते तालुकाध्यक्ष आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे हे होते सदर कार्यक्रमाला आमदार शिरीषदादा चौधरी यांचे चिरंजीव NSUI चे प्रदेश सरचिटणीस धनंजयभाऊ चौधरी, सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीपभैय्या सोनवणे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलीलदादा पटेल, महेलखेडीच्या सरपंच शरिफाताई तडवी,रवींद तायडे,किसन तायडे, पत्रकार फिरोज तडवी,माजी उपसरपंच माया महाजन, जयंता पाटील, ग्राप सदस्या शामिना पटेल, विजया महाजन, नामदेव झुरकाळे, सुदाम पाटील,अर्जुन महाजन,पराग महाजन,प्रभाकर महाजन,दिनकर पाटील,प्रमोद महाजन,अब्दुल देशमुख,फत्तू पटेल,अनिस पटेल, भरत तायडे,सत्तार तडवी, आशिष झुरकाळे, सोपान तायडे सह ग्राम पंचायत कर्मचारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
मोठा निर्णय: नवरात्री पासून राज्यातील मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली होणार;तर 4 ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार असेच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा लिंक वर क्लिक करा मुंबई: कोविड संकटात राज्यातील मंदिरे दीड वर्ष पासून बंद आहेत.आता मात्र परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा सामना केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धा...
दि.4 डिसेंबर यावल तालुक्यात अंजाळे शिवारात काल दि.2 रोजी सर्कल आणि तलाठी यांनी संयुक्त कारवाई करीत 3 ब्रास खडीने भरलेले डंपर,आणि एक ब्रास डबर भरलेले ट्रॅक्टर अवैध अनाधिकृत कोणतेही परमिट न काढताना वाहतूक करताना आढळून आल्याने पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.महसूल कर्मचार्यांनी पकडलेले हे दोघं वाहन मात्र एका अधिकाऱ्याने सोडून देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कायदेशीर पळवाटा शोधल्या.याबाबत प्रांताधिकारी कैलास कडलक चौकशीअंती संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे सुद्धा संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून आहे. यावल तहसील कार्यक्षेत्रात तापी नदी किनारपट्टी परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन करून खडी,गिट्टी,मुरूम,डबर, दगडाचा बारीक किस काही क्रशर चालक अवैध रित्या तसेच नाम मात्र परमिट काढून वाजवी पेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज उत्खनन करून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई करून घेत आहेत यात काही क्रशरवाले 30 हजार रुपया पासून तर 50 हजार रुपये मासिक हप्ता कोणाला देतात?आणि यांच्यावर कारवाई का होत नाही?याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी काल दि. 2 ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा